घुग्घुस शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : ना. वड्डेटीवार
चंद्रपुर Tak
आशाताई, सफाईकर्मी सत्कार कार्यक्रम संपन्न
घुग्घुस (चंद्रपूर) : गेली पाच वर्षे सत्तेत असणाऱ्या विकास पुरुषांनी घुग्घुस शहराला विकासा पासून वंचित ठेवले. यापुढे या शहराचा विकासाला निधी कमी पडू देणार नाही, असे व्यक्तव्य पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलं. राजूरेड्डी यांच्या वाढदिवसा निमित्याने आयोजित केलेल्या कार्यक्रमातते बोलत होते. घुग्घुस शहर काँग्रेसचा गड आहे. येथिल जनता काॕग्रेस विचाराची आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले.
घुग्घुस हे शहर काँग्रेसचा गड आहे. येथील नागरिक हे काँग्रेसी विचार धारे वर विश्वास करणारे आहे. गेली पाच वर्षे सत्तेत असणाऱ्या विकास पुरुषांनी या शहराला विकासा पासून वंचित ठेवले. या शहराला राजुरेड्डी सारखा नेता लाभला. राजूच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे कार्य कौतुकास्पद आहे. मी माझ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा असून या शहराच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही. शहरात आग लावणाऱ्याची संख्या जास्त आहे. विझविनाऱ्यांची संख्या कमी असल्याने या शहराला मी अग्निशमन वाहन दिले आहे.असा खोचक टोला वडेट्टीवारांनी विरोधकांना लगावला.
पक्ष भावना बाजूला ठेवून काँग्रेस नेत्यांच्या वाढदिवसाला या मंचावर उपस्थित झालो हे केवळ राजू करिताच. गेल्या अनेक वर्षांपासून शहराला मोफत पाणी पुरवठा करण्याचे कार्य हे प्रशंसनीय असल्याचे मत आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी राजूरेड्डी यांचा चाळीस वा वाढदिवस मोठ्या जल्लोषात सेवा दिन म्हणून साजरा केला.
कोरोना काळात आपल्या जीवाची कुटूंबाची तमा न बाळगता दिवस रात्र सेवा देणाऱ्या 'आशा' सेविका, अंगणवाडी सेविका यासोबतच समाजात तिरस्कारांच्या दृष्टीने बघितल्या जाणाऱ्या नगरपरिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांना उचित सन्मान देण्यासाठी राज्याचे बहुजन विकास मंत्री नामदार विजय वड्डेटीवार, आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व साडी देऊन सत्कार करण्यात आला व दिव्यांग बांधवाला तीन चाकी सायकलचे वितरण करण्यात आले. सदर कार्यक्रमात सौ.पुष्पा नक्षिणे, सौ.पदमा त्रिवेणी, सौ.पुष्पा कनकम यांच्या माध्यमातून शेकडो महिलांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
अरविंद चंहादे, सुकुमार गुंडेटी, अनुप भंडारी, अविनाश गॉगुर्ले, संदीप चटकी, यांच्या माध्यमातून शेकडो युवक पुरुषांनी काँग्रेस मध्ये प्रवेश घेतला. याप्रसंगी मंचावर ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळेजी, सेवा दल जिल्हाध्यक्ष सूर्यकांत खणके, माजी चंद्रपूर नगराध्यक्ष सुरेश महाकुलकर, तालुका अध्यक्ष श्यामकांत थेरे,किसान जिल्हाध्यक्ष रोशन पचारे, अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष पवन आगदारी, प्रमोद बोरीकर, अशोक मते, विजय मते, सूरज तोतडे सरपंच पांढरकवडा, ब्रिजेश सिंग प्रदेश सचिव उत्तर भारतीय सेल, युवक अध्यक्ष तौफिक शेख, अल्पसंख्याक नेते अझहर शेख, शेख शमीउद्दीन, शामराव बोबडे, तिरुपती महाकाली, स्टीवन गुंडेटी, किशोर बोबडे,अलीम शेख, मोसीम शेख,श्रीहरी शेंगारप, अनिरुद्ध आवळे, विजय माटला, शेखर तंगडपल्ली, अजय उपाध्ये, कोंडय्या तलारी, शहजाद शेख, राकेश खोब्रागडे, सौ.पदमा रेड्डी, पुष्पा नक्षिणे, पदमा त्रिवेणी, दीपा बोकडे, अमिना बेगम, दुर्गा पाटील, संध्या मंडल, पुष्पा कनकम, यास्मिन सैय्यद, सरिता गोहोकार, मंगला बुरांडे, सरस्वती कोवे, सुनीता राखुंडे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कामगार नेते सैय्यद अनवर यांनी केले तर सूत्र संचालन सुनील माहुरे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोशन दंतलवार, इर्शाद कुरेशी, रोहित डाकूर, सुकुमार गुंडेटी, अनुप भंडारी, बालकिशन कुळसंगे, देव भंडारी, कपिल गोगला, कुमार रुद्रारप, संजय कोवे, बल्ली भाई, आकाश चिलका, शाहरुख शेख, सचिन नागपुरे, रफिक शेख, दीपक पेंदोर,सचिन कोंडावार, सुनील पाटील, अंकुश सपाटे, रंजित राखुंडे, अय्यूब कुरेशी, विजय रेड्डी, नागेश कुचनकर, राहुल पंधरे, प्रदीप आसेकर, जाफर शेख, प्रणय लिंगांपेल्ली, विशाल नागपुरे, विशाल लोणगाडगे, अमित सावरकर, सुबोध आवळे, राकेश डाकूर, यांनी अथक परिश्रम घेतले.





